रत्नागिरीतून आषाढी वारीसाठी 30 मोफत बसेस रवाना
रत्नागिरीतून आषाढी पंढरपूर वारीसाठी 30 मोफत बसेस भक्तिभावाने रवाना झाल्या. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या प्रेरणेतून संपूर्ण कोकणातून 300 मोफत बसेसद्वारे हजारो वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची संधी उपलब्ध झाली.